Home महाराष्ट्र संजय राऊतांची गांजाची नशा अजून उतरली नाही का? चित्रा वाघ यांची संजय...

संजय राऊतांची गांजाची नशा अजून उतरली नाही का? चित्रा वाघ यांची संजय राऊतांवर टीका

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

औरंगाबाद : तोंडाळी गावात काल दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला. दरोडेखोरांनी पुरूषांना अमानुष मारहाण करत दोन महिलांवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. यावरून पुन्हा एकदा भाजपाच्या आक्रमक नेत्या चित्रा वाघ यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

हे ही वाचा :‘देशाची सेवा करण्यासाठी तुरुंगातही जाईल’; समीर वानखेडेंचे नवाब मलिकांना प्रत्युत्तर

संजय राऊत यांची उच्च प्रतीच्या गांजाची नशा अजून उतरली नाही का? औरंगाबादमधील बलात्काराच्या घटनेवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एक शब्दही काढला नाही. राज्यात रोज महिला अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. संजय राऊत नेहमी कोणत्या ना कोणत्या विषयांवरून टीका करताना नेहमी दिसतात. कदाचित त्यांची गांजाची नशा अद्याप उतरली नाही, असं चित्रा म्हणाल्या आहेत.

राज्यात एकही जिल्हा असा नाही, जिथे महिलांचे शोषण होत नाही. महिलांवरचे शोषण थांबण्यासाठी नवीन कायदा कधी येणार माहिती नाही. कॉमन मिनिमम प्रोग्राममध्ये महिला सुरक्षेचा मुद्दा आहे का? असा सवालही चित्रा वाघ यांनी यावेळी उपस्थित केला.

महत्वाच्या घडामोडी –

‘शिवशाही’चं वचन देणा-यांनी ‘निजामशाही’ आणलीये; औरंगाबाद महिला बलात्कार घटनेवरून चित्रा वाघ यांचा हल्लाबोल

नवाब मलिक सारखा विकृत माणूस जगात जन्माला येता कामा नये- निलेश राणे

रूपाली चाकणकरांच्या महिला आयोग अध्यक्षपदाच्या निवडीवर मनसेच्या ‘या’ महिला नेत्याची प्रतिक्रिया, म्हणाल्या…