Home अहमदनगर समृद्धीवर मनसैनिकांनी टोलनाका फोडला, आता यावर अमित ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

समृद्धीवर मनसैनिकांनी टोलनाका फोडला, आता यावर अमित ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

अहमदनगर : मनसे नेते अमित ठाकरे नाशिक-नगर दौऱ्यावर असताना जोरदार राडा झाला आहे.

अमित ठाकरे यांच्या गाडीचा ताफा टोल व्यवस्थापनाने थांबवल्याचा आरोप मनसे कार्यकर्त्यांनी केला आहे. या घटनेविरोधात संताप व्यक्त करत मनसे कार्यकर्त्यांनी समृद्धी महामार्गावर असलेल्या सिन्नर येथील टोलनाक्यावर तोडफोड केली. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता अमित ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ही बातमी पण वाचा : आता एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री असतील, तर…; भाजपाच्या नेत्याचं मोठं विधान

टोलनाक्यावरच्या कर्मचाऱ्यांची उद्धट भाषा होती. फास्टटॅग असूनही गाडी बराचवेळ थांबवली. टोलनाक्याची टेक्निकल अडचण होती. मॅनेजरसह कर्मचाऱ्याची भाषा उद्धटपणाची होती, असं अमित ठाकरे यांनी म्हटलं.

दरम्यान, मी जेव्हा नाशिकला पोहोचलो तेव्हा मला कळालं टोल नाका फोडला. राज ठाकरे यांच्यामुळे अनेक टोलनाके बंद झाले, आता त्यात माझ्यामुळे आणखी एकाची भर पडली., असंही अमित ठाकरे म्हणाले.

महत्त्वाच्या घडामोडी –

“IND W विरूद्ध BAN W, सामना बरोबरीत सुटूनही सुपर ओव्हर का नाही?; वाचा, नक्की काय आहे कारण”

“मी, अजित अनंतराव पवार, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की…!” लवकरच….”

“शरद पवारांचा मोठा डाव; अजित पवारांना पाठिंबा दिलेल्या ‘या’ नेत्याची पुन्हा शरद पवारांकडे वापसी”