Home मनोरंजन “फार मोठी चूक करताय; सुचक वक्तव्यासह कंगना रणाैतने मुंबई सोडली”

“फार मोठी चूक करताय; सुचक वक्तव्यासह कंगना रणाैतने मुंबई सोडली”

मुंबई : अभिनेत्री कंगना रणाैतने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्यानंतर अनेक स्तरांतून तिला विरोधाचा सामाना करावा लागला होता. सध्या मिळालेल्या सूत्रांच्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वीच मुंबईत आलेल्या कंगनानं पुन्हा एकदा मुंबई सोडल्याचं म्हटलं जात आहे. एएनआय या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार सोमवारी सकाळच्या सुमारास कंगनाला तिच्या मुंबईतील घरातून विमानतळाच्या दिशेनं जाताना पाहायला मिळालं. कंगना नेमकी कुठं चालली आहे, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मुंबईतून जाण्याच्या मार्गावर असणाऱ्या कंगनानं यावेळी ट्विट करत पुन्हा एकदा सूचक वक्तव्य केल्याचं पहायला मिळालं आहे.

ज्यावेळी रक्षकच भक्षक झाले आहेत, लोकशाहीचं वस्त्रहरण सुरु आहे, मला कमकुवत समजून तुम्ही फार मोठी चूक करत आहात, असं कंगणानं ट्विट केलं आहे.

मुंबईतून काढता पाय घेताना आपण, जड अंत:करणानं शहर सोडत असल्याचं ती म्हणाली. मला ज्या प्रकारे घाबरवण्यात, धमकवण्यात आलं, माझ्यावर हल्ले झाले, शिवीगाळ करण्यात आली. राहतं घर, कार्यालय तोडण्याचा प्रयत्न करण्यात आला असं म्हणत आपल्याभोवती शस्त्रास्त्र आणि सुरक्षा रक्षकांचा वेढा होता त्यामुळं POK बाबत आपण केलेलं वक्तव्य योग्य होतं, असंही कंगणानं म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी- 

महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांनी मराठा आरक्षणबाबतीत पंतप्रधान मोदींना निवेदन द्यावे- छत्रपती संभाजीराजे

“तिन्ही पक्षांपेक्षा आमचा पक्ष मोठा आहे, पण आज आम्ही विरोधी बाकांवर बसलेलो आहोत”

हे वक्तव्य त्यांनी पुन्हा एकदा मातोश्रीमध्ये लपून राहण्यासाठी केलं; चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना टोला

“मुंबई असो कि महाराष्ट्र एकच ब्रँड छत्रपती शिवाजी महाराज”