Home जळगाव “महाविकास आघाडी सरकार संधीसाधू, त्यांना जनतेशी काही घेणंदेणं नाही”

“महाविकास आघाडी सरकार संधीसाधू, त्यांना जनतेशी काही घेणंदेणं नाही”

जळगाव : राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये एकमत नसून हे सरकार संधीसाधू आहे. त्यांना जनतेशी काही देणंघेणं नाही, असं म्हणत भाजप नेते गिरीष महाजन यांनी राज्य सरकारला टोला लगावला आहे. वाढीव वीज बिले, ट्रान्सफॉर्मरचा प्रश्न तसेच इतर कारणांमुळे महावितरण कंपनीच्या विरोधात भाजपने राज्यव्यापी आंदोलन केलं आहे. त्यात ते बोलत होते.

सरकारने सातबारा उतारा कोरा करण्याची घोषणा केली होती. त्या बाबतीत कुठल्याही स्वरूपाची कार्यवाही झाली नाही. शेतकऱ्यांना खते, बियाणे मिळाले नाही. राज्यातील शेतकरी संकटात असताना या सरकारने कानावर हात ठेवले, असं म्हणत गिरीश महाजन यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

फासा आम्हीच पलटणार; देवेंद्र फडणवीसांच मोठं विधान

जे खरं आहे ते स्वीकारून शुन्याचे शंभर करण्याची धमक आपण ठेवलीये- जयंत पाटील

“गृहमंत्री अनिल देशमुख यांना कोरोनाची लागण”

मुंबईमध्ये भाजपला मोठा धक्का; ‘या’ माजी आमदाराचा शिवसेनेत प्रवेश