Home महाराष्ट्र राज्यातील आघाडी सरकार तीन फांद्यांच झाड, जून महिन्यात ते कोसळेल- नारायण राणे

राज्यातील आघाडी सरकार तीन फांद्यांच झाड, जून महिन्यात ते कोसळेल- नारायण राणे

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे हे सातत्यानं महाविकास आघाडीवर टीका करत असतात. अशातच आजही त्यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.

राज्यातील आघाडी सरकार तीन फांद्याचं झाड आहे. जून महिन्यात राजकीय वादळ येईल आणि हे आघाडी सरकार कोसळेल, असा दावा नारायण राणेंनी यावेळी केला. ते वाशीममध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

हे ही वाचा : “कोल्हापूरातील विजयानंतर जयश्री जाधव पहिल्यांदाच शरद पवारांच्या भेटीला, चर्चांना उधाण” 

दरम्यान, शिवसेनेला प्रशासन चालवता येत नाही. मुख्यमंत्रीपद सांभाळण्याइतका शिवसेनेचा आवाका नाही. अडीच वर्षांत मुख्यमंत्री फक्त एकदा मंत्रालयात येतात. दोन तासात फाईल निकाली काढल्याचे सांगतात यावरूनच त्यांचा प्रशासकीय अनुभव किती तोकडा आहे, हे लक्षात येते., असा टोलाही राणेंनी यावेळी मुख्यमंत्र्यांना लगावला.

महत्वाच्या घडामोडी –

भोंग्यांबद्दल सरकारला अल्टीमेटम देणाऱ्या राज ठाकरेंची औकात काय?; ‘या’ माजी आमदाराचा हल्लाबोल

“राज ठाकरेंची तुलना बाळासाहेबांशी होऊ शकते का?; नारायण राणेंनी दिलं उत्तर, म्हणाले… साहेब म्हणजे…”

“कुणाला धोका असेल आणि सुरक्षा पुरविली जात असेल तर हरकत नाही”