Home क्रीडा कटक वनडेत भारताचा विराट विजय; 2-1 ने जिंकली मालिका

कटक वनडेत भारताचा विराट विजय; 2-1 ने जिंकली मालिका

कटक : कटक वनडेत भारताचा विराट विजय झाला. भारताने ही मालिका 2-1 ने जिंकली आहे. वेस्ट इंडिजने दिलेलं 316 धावांचं आव्हान भारताने 4 बळी 8 चेंडू राखून पूर्ण केलं आहे.

रोहित शर्मा आणि केएल राहुलने टीम इंडियासाठी धमाकेदार खेळी केली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 122 धावांची भागिदारी केली. रोहित शर्माने 8 चौकार आणि 1 षटकारासह 63 धावा केल्या. तर लोकेश राहुलने 77 रनची खेळी केली.

विराट कोहलीने 85 रनची खेळी करत भारताचा विजय खेचून आणला. रवींद्र जडेजाने नाबाद 39 रन केले. जडेजाने कोहलीसोबत महत्त्वाची 58 रनची भागीदारी केली.

दरम्यान,  वेस्ट इंडिजकडून निकोलस पूरणने  64 चेंडूत 89 धावा तर केरॉन पोलार्डने 51 चेंडूत 74 धावांची खेळी केली

महत्वाच्या घडामोडी-

-ही माती माझी ओळख सांगते, जितेंद्र आव्हाडांनी कवितेतून दर्शवला नागरिकत्व कायद्याला विरोध

-महाविकास आघाडी सरकारने जनतेच्या विश्वासघाताची मालिका कायम ठेवली- चंद्रकांत पाटील

-शेतकऱ्याचं कर्जमाफ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेची मोठी घोषणा

-निलेश राणे यांनी केली संजय राऊतांवर आक्षेपार्ह पोस्ट