Home महाराष्ट्र जर पोलिसांना प्रियांका गांधी यांना सोडलं नाही तर…; नाना पटोलेंचा इशारा

जर पोलिसांना प्रियांका गांधी यांना सोडलं नाही तर…; नाना पटोलेंचा इशारा

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खीरी मध्ये काल आंंदोलक शेतकऱ्यांच्या मृत्यूनंतर देशभरात संतापाची लाट तयार झाली आहे. काल रात्री काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी लखीमपूरला शेतकऱ्यांच्या कुटूंबियांचे सांत्वण करण्यासाठी जात असताना त्यांना पोलिसांनी रोखलं. तसेच मध्यरात्री उशिरा त्यांना अटक केली. यावरून देशभरात संताप व्यक्त केला जात आहे. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली.

प्रियांका गांधींना पोलिसांना सोडावंच लागेल. जर पोलिसांनी प्रियांका गांधींना सोडलं नाही तर, आम्ही राज्यभर जेलभरो आंदोलन करू, असा इशारा नाना पटोले यांनी यावेळी दिला. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

महत्वाच्या घडामोडी –

पूरग्रस्त भागाची पाहणी केली म्हणजे सर्व कळते असे नाही; अजित पवारांचं प्रत्युत्तर

कोणीही गेलं तरी, शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक आपल्यासोबत- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

“ऑफीसच्या एसीत बसून मोठे लिडर झाले, यांना शेतकऱ्यांचं काय दु:ख कळणार”

“कोणी कितीही निर्धार करा, जिल्हा बँक राष्ट्रवादीकडेच येणार”