Home क्रीडा अनुभवी रोहितवर नवखा पंत पडला भारी; दिल्लीचा मुंबईवर 6 गडी राखून विजय

अनुभवी रोहितवर नवखा पंत पडला भारी; दिल्लीचा मुंबईवर 6 गडी राखून विजय

चेन्नई : IPL 2021 हंगामातील 13वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात झाला. या रंगतदार सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने विजय मिळवला.

मुंबईने दिल्ली कॅपिटल्सला 138 धावांचे लक्ष्य दिले होते. या लक्ष्याचा पाठलाग करतांना दिल्लीने पृथ्वी शॉची विकेट लवकर गमावली. मात्र त्यांनतर शिखर धवन आणि स्टीव्ह स्मिथने भागीदारी करत दिल्लीच्या विजयाचा पाया रचला.

“महाविकास आघाडीला अपवित्र युती म्हणणारे अमित शहा म्हणजे ब्रह्मदेव नाहीत”

शिखर धवन 45 धावांवर आणि स्टीव स्मिथ 33 धावांवर बाद झाल्यावर सामन्यात चुरस निर्माण झाली होती. त्यांनतर कर्णधार रिषभ पंत देखील अवघ्या 7 धावा काढून बाद झाला. मात्र ललित यादव नाबाद 22 आणि शिम्रोन हेटमायर नाबाद 14 यांनी संयमी फलंदाजी करत दिल्लीच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

दरम्यान, मुंबई कडून रोहित शर्माने 30 चेंडूत 44 धावा केल्या. तर अखेरीस इशान किशनने 28 चेंडूत 26 धावा करत एकाकी झुंज देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या व्यतिरिक्त एकाही मुंबईच्या फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही.

महत्वाच्या घडामोडी –

माझी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे, की…;राजेश टोपेंचं राज्यातील नागरिकांना आवाहन

“राज्यात 15 दिवसांचा लाॅकडाऊन लागणार”

“काँग्रेस नेते राहुल गांधी कोरोना पाॅझिटिव्ह”