Home महाराष्ट्र कधी कधी ‘ठोकशाही’ने मिळालेला न्याय पण स्वागतार्ह वाटतो- राज ठाकरे

कधी कधी ‘ठोकशाही’ने मिळालेला न्याय पण स्वागतार्ह वाटतो- राज ठाकरे

मुंबई : हैदराबादमध्ये महिला डॉक्टरवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींना एन्काउंटरमध्ये पोलिसांनी ठार केलं आहे. यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रीया व्यक्त केली आहे.

कधी कधी ‘ठोकशाही’ने मिळालेला न्याय पण योग्य आणि स्वागतार्ह वाटतो. असं ट्वीट करत राज ठाकरे यांनी हैद्राबाद पोलिसांच स्वागत केलं आहे.

ह्याला म्हणतात न्याय अश्या हरामखोरांना भर चौकात गोळ्या घातल्या पाहिजे. महाराष्ट्राच्या पोलिसांनी पण ह्यातून काही शिकलं पाहिजे, कोपर्डीची घटना पण अशीच होती पण ते हरामी आजही सरकारचं खातायत. सगळ्याच बलात्काराच्या केसेस मध्ये हीच शिक्षा झाली पाहिजे,  अश्या अशयाचं ट्वीट करत निलेश राणे यांनीही हैद्राबाद पोलिसांच कौतुक केलं आहे.

दरम्यान, एन्काऊंटनंतर हैद्राबाद पोलिसांवर देशभरातून कौतुकांचा वर्षाव होत आहे. तसचं अनेक नेत्यांनीही तेलंगणा सरकार आणि हैद्राबाद पोलिसांना शुभेच्छा दिल्या आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

“महाराष्ट्राच्या पोलिसांनी पण ह्यातून काही शिकलं पाहिजे”

न्याय झालाय पण ही पद्धत अन्यायकारक- नवाब मलिक

भारतानं टॉस जिंकत घेतला गोलंदाजी करण्याचा निर्णय

मानवधिकार आयोग करणार हैदराबाद एन्काऊंटरची सखोल चौकशी