“शिवसेनेला 5 वर्षे मुख्यमंत्रिपद देऊन भाजपने पुन्हा महायुतीचं सरकार स्थापन करावं”

0
558

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी बोलताना, शिवसेना-भाजप युतीबद्दल तसेच शिवसेनेला मुख्यमंत्रीपद किती वर्षे द्यावं याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

शिवसेना भाजप आरपीआय महायुतीचे सरकार पुन्हा स्थपन करणे हीच शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना खरी अदारांजली ठरेल. त्यासाठी शिवसेनेला 5 वर्षे मुख्यमंत्रिपद देऊन भाजपला 50 टक्के सत्तेतील वाटा देऊन पुन्हा महायुतीचे सरकार स्थापन करावे, असं रामदास आठवले यांनी म्हटलं.

दरम्यान, शिवसेना आणि भाजपमध्ये 50-50 फॉर्मुल्यावरुन मोठा वाद झाला. त्यानंतर शिवसेना-भाजप युती तुटली. मुख्यमंत्रिपदावरुन झालेल्या सेना-भाजपच्या या वादाचा फायदा राष्ट्रवादीने घेतला आणि शिवसेनेसोबत हातमिळवणी करुन महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं. त्यानंतर शिवसेना-भाजप आणि इतर मित्रपक्षांनी पुन्हा एकदा एकत्र येत सरकार स्थापन करण्याबाबत आता पुन्हा चर्चा सुरू झाल्या आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

अनिल देशमुखांना जो त्रास दिला जातोय, त्याचा एक-एक मिनिट मी वसूल करणार- शरद पवार

“जालन्यात काँग्रेसला मोठा धक्का; ‘या’ नेत्यानं केला राष्ट्रवादीत प्रवेश”

“सुर्यकुमार चमकला! रंगतदार झालेल्या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 5 विकेट्सने केला पराभव”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here