गेल्या दिड- दोन महिन्यात महाराष्ट्राने बिन पैशाचा तमाशा बघितला- राज ठाकरे

0
293

पुणे : गेल्या दिड- दोन महिन्यात महाराष्ट्राने बिन पैशाचा तमाशा बघितला आहे, असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

मनसेच दोन दिवसांचं शिबीर आज पुण्यात सुरु झालं आहे. यावेळी कार्यकर्त्यांशी बोलताना त्यांनी टीका केली आहे. यावर शनिवारी पत्रकार परिषद घेऊन राज ठाकरे सविस्तर बोलनार असल्यची माहिती समोर आली आहे.

सत्ता स्थापनेसाठी भाजप, शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यामध्ये झालेल्या चर्चा आणि त्यानंतर आजित पवार यांच्या मदतीने भाजपने एका रात्रीत स्थापन केलेले सरकार. यावर राज ठाकरे यांनी मौन बाळगलं होतं. त्यानंतर दिड महिन्यांनी राज ठाकरे यांनी प्रितिक्रिया दिली आहे.

दरम्यान, 24 जानेवारीला मुंबईमध्ये मनसेचं महाआधिवेशन होणार आहे. बाळासाहेब ठाकरें यांच्या जयंतीचा मुहूर्त आधिवेशनासाठी काढण्यात आला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

-राहुल द्रविडच्या मुलाने ठोकले द्विशतक

-बाळासाहेब हयात असते तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झालेच नसते- नारायण राणे

-नागरिकत्व कायद्याला जे लोक विरोध करत आहेत ते देशद्रोही- संभाजी भिडे

-अजित पवार हे आमचे होणारे उपमुख्यमंत्री; संजय राऊत यांचं सुचक वक्तव्य!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here