Home क्रीडा अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात मिळालेला हा विजय सर्व भारतीयांच्या लक्षात राहील; मुख्यमंत्र्यांकडून काैतुक

अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात मिळालेला हा विजय सर्व भारतीयांच्या लक्षात राहील; मुख्यमंत्र्यांकडून काैतुक

मुंबई : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने धडाकेबाज विजय मिळवला आहे. यानंतर सर्वच स्तरातून टीम इंडियावर कौतुकांचा वर्षाव होत आहे. टीम इंडियाच्या या धडाकेबाज विजयानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टीम इंडियाचं काैतुक केलं आहे.

गाबाच्या मैदानावर अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात मिळालेला हा विजय सर्व भारतीयांच्या लक्षात राहील, असं उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच पहिल्या कसोटी सामन्यात पराभव पत्करावा लागल्यानंतर देखील भारतीय संघानं दुर्दम्य आशावाद आणि जिद्द यांच्या जोरावर संपूर्ण कसोटी मालिका जिंकली, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

दरम्यान, धावांचा यशस्वी पाठलाग करताना भारतीय संघानं या मालिकेत नवीन विक्रम प्रस्थापित केला, ही देशातील सर्व क्रिकेटवीरांसाठी अभिमानाची बाब आहे, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी टीम इंडियाचं भरभरून काैतुक केलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“भाजप नेत्यांनी खोटे आकडे सांगून जनतेची दिशाभूल करण्यापेक्षा आपला पराभव स्वीकारावा”

रिषभ पंतची मॅच विनिंग खेळी; भारताची ऑस्ट्रेलियावर 3 विकेट्सनी मात, भारताने मालिका जिंकली

धनंजय मुंडेंवरील संकट दूर होवो; नगरसेवकाचं दोन किलोमीटरपर्यंत दंडवत

“स्वतःला मोठे समजणारे जाणते नेते येणाऱ्या काळात महाराष्ट्राच्या राजकीय नकाशावर दिसणार नाही”