Home पुणे कुणीही स्वप्न बघू नका; दिलीप वळसे पाटलांचा चंद्रकांत पाटलांंना टोला

कुणीही स्वप्न बघू नका; दिलीप वळसे पाटलांचा चंद्रकांत पाटलांंना टोला

पुणे : महाविकास आघाडीच्या सरकारला पाडण्यासाठी बाहेरून कोणाला काही करावं लागणार नाही, असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं. यावर स्वप्न बघायचं कोणालाही काही कारण नाही, हे सरकार पूर्ण पाच वर्षे चालणार आहे, असं म्हणत  कॅबिनेटमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी चंद्रकातं पाटील यांना लक्ष केल आहे. ते पुण्यात माध्यमांशी बोलत  होते.

महाविकासआघाडीतील जे नेते नाराज अहेत त्यांची नाराजी वरिष्ठ नेते दूर करतील कोणीही काळजी करायचं कारण नाही, असंही वळसे पाटील यांनी म्हटलं आहे.

उद्योग व कामगार यांच्यात समन्वय साधण्याच्या दृष्टीने काम केलं जाणार आहे. उद्योजकांचे उत्पन्न कसं वाढेल व कामगारांना कसा न्याय मिळेल हे पाहिलं जाणार आहे, असं वळसे पाटील म्हणाले.

आर्थिक मंदीच सावट देशभर असल्यामुळे उद्योग क्षेत्रासमोर काही समस्या आहेत. त्या देखील सोडवण्याचा प्रयत्न आमचं सरकार करणार असल्याचं वळसे पाटील यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

-“शेतकऱ्यांशी कुणालाही काहीच घेणंदेणं नाही, केवळ मालपाणी कमवण्याकरता हे सर्व लोक एकत्र आलेत”

-“सातबारा कोरा केला नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही म्हणणारे अजित पावार कुठेे आहेत”

-2020 मधल्या पहिल्याच टी-20 सामन्यावर पावसाचं पाणी; भारत-श्रीलंका सामना रद्द

-“हिंमत असेल तर या तिन्ही पक्षांनी स्वतंत्र लढवून दाखवावं”