“अशांना मंत्री केल्याने शिवसेनेला फरक पडत नाही”

0
298

कोल्हापुर : एकेकाळी शिवसेनेचे फायरब्रँड नेते राहिलेल्या नारायण राणे यांची भाजपामध्ये गेल्यानंतर थेट केंद्रीय मंत्रिपदी वर्णी लागली आहे. शिवसेनेला शह देण्यासाठीच भाजपाकडून नारायण राणेंना केंद्रीय मंत्रीपद देण्यात आलं असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे आमदार आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर निशाणा साधलाय.

शिवसेनेवर टीका करणाऱ्यांना ग्रामपंचायतही जिंकता आलेली नाही. अशांना मंत्री केल्याने शिवसेनेला फरक पडत नाही. भाजपाने कोकणातले पंतप्रधान जरी केले तरी शिवसेना संपणार नाही”, असं सामंत म्हणाले आहेत. कोल्हापुरातील शिवसंपर्क अभियानाच्या मेळाव्यात ते बोलत होते.

दरम्यान, अंगावर आले कि शिंगावर घेण्याची शिकवण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिली आहे. आम्ही कोणाकडे शिंग घेऊन मारायला जात नाही. त्यामुळे विरोधकांच्या टीकेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कृतीतून उत्तर देत आहेत, असंही उदय सामंत म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी –

“शरद पवारांच्या भेटीनंतर आता निवडणूक स्ट्रॅटेजिस्ट राहुल गांधी, प्रियांका गांधींच्या भेटीला”

माझा नेता नरेंद्र मोदी आणि अमित शहा; पंकजा मुंडेंचा फडणवीसांवर निशाणा?

नाना पटोलेंची अवस्था रोज मरे, त्याला कोण रडे अशी झालीये- प्रवीण दरेकर

मी मंत्री झालो, मुंडे साहेब माझे नेते होते आणि आज पंकजाताई आहेत- डाॅ.भागवत कराड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here