बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न पुरस्कार द्या; राज ठाकरे यांची केंद्र सरकारकडे मागणी

0
167

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्र सरकारकडे शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, अशी मागणी केली आहे.

केंद्र सरकारने तीन दिग्गजांना आज भारतरत्न पुरस्कार घोषित केला आहे. यामध्ये माजी पंतप्रधान आणि काँग्रेस नेते नरसिंह राव, चौधरी चरण सिंग आणि प्रसिद्ध शास्त्रज्ञ आणि हरित क्रांतीचे जनक एमएस स्वामीनाथन यांचा समावेश आहे. यानंतर आता राज ठाकरे यांनी केंद्र सरकारकडे बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी केली आहे.

ही बातमी पण वाचा : “ठाकरे गटाचे नेते अभिषेक घोसाळकर गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट, पोलिसांनी ‘त्या’ व्यक्तीला केली अटक”

“माजी पंतप्रधान स्व. पी.व्ही. दरम्यान, नरसिंहराव, स्व. चौधरी चरण सिंग आणि भारतीय हरित क्रांतीचे जनक एस.स्वामिनाथन ह्यांना भारतरत्न सन्मान घोषित करण्यात आला. ह्या यादीतले एस.स्वामिनाथन ह्यांचं अवघ्या काही महिन्यांपूर्वी निधन झालं. इतकी अफाट कामगिरी करणाऱ्या शास्त्रज्ञाला त्यांच्या हयातीत हा बहुमान मिळायला हवा होता”, अशीही भावना राज ठाकरे यांनी व्यक्त केली.

महत्त्वाच्या घडामोडी – 

“ब्रेकींग न्यूज ! ठाकरे गटाचे नेते अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार, उपचारादरम्यान मृत्यू”

मोठी बातमी! जळगावमधून भाजपच्या माजी नगरसेवकार गोळीबार

मोठी बातमी! निवडणूक आयोगाचा निकाल जाहीर होताच शरद पवार गटाने केली ‘ही’ मोठी घोषणा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here