Home महाराष्ट्र “महाविकास आघाडी सरकार म्हणजे तीन बायकांचा संसार”

“महाविकास आघाडी सरकार म्हणजे तीन बायकांचा संसार”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

औरंगाबाद :  महाविकास आघाडी सरकार म्हणजे तीन बायकांचा संसार, असं वक्तव्य एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केलं आहे. ते 2 दिवसीय औरंगाबाद दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर टीका केली  आहे.

राजकारणात काहीही अशक्य नसते कधीही काहीही होऊ शकते. जर त्यांची तयारी असेल तर आम्ही नक्की आघाडी करु, असे म्हणत येणाऱ्या काळात होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असदुद्दीन ओवेसी यांनी वंचित बहुजन आघाडीसोबत जाण्याचे संकेत दिले आहेत.

हे ही वाचा : न्यूझीलंडकडून भारताचा 8 विकेट्सने पराभव; सेमी-फायनलचा मार्ग झाला आणखी खडतर

काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र लग्न करतात. हा तर तीन बायकांचा संसार असल्याचं म्हणत  हे कुठलं सेक्युलॅरिझम आहे? असा खोचक सवाल असदुद्दीन ओवेसी यांनी यावेळी उपस्थित केलाय.

दरम्यान, मुस्लिम आरक्षणासाठी एमआयएम मुंबईपर्यंत तिरंगा रॅली काढणार आहे. तिरंगा झेंडा हातात घेऊन एमआयएम दुचाकी रॅली काढणार असल्याचंही असदुद्दीन ओवेसी यांनी जाहीर केलं आहे.

महत्वाच्या घडामोडी – 

 ‘आगामी सर्व निवडणुका महाविकास आघाडी एकत्रित लढणार’; शिवसेनेच्या ‘या’ नेत्याचा दावा

 ‘आगामी सर्व निवडणुका महाविकास आघाडी एकत्रित लढणार’; शिवसेनेच्या ‘या’ नेत्याचा दावा

‘हे’ सरकार टिकण्यामध्ये मुख्यमंत्र्यांचा मोठा वाटा; बाळासाहेब थोरातांकडून उद्धव ठाकरेंचं कौतुक