आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर मधील वाढती गुन्हेगारी लक्षात घेऊन, रात्री 11 वाजलेनंतर शहर बंद करण्याचा, निर्णय पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांनी घेतला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात निर्माण झालेली परिस्थिती पाहता, जिल्हाधिकाऱ्यांनी इंटरनेट सेवा तात्पुरती खंडीत करण्याचा निर्णय घेतला होता. अशातच आता, छत्रपती संभाजीनगर रात्री 11 वाजेनंतर शहर बंद करण्याचा, निर्णय पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांनी घेतला आहे. त्यासाठी गुन्हे शाखा कामाला लागली असून, रात्री 10.30 वाजेनंतर सहा पथके एकाच वेळी रस्त्यावर उतरत आहेत. वेगवेगळ्या भागांत जाऊन आस्थापना बंद करण्याचे आवाहन, कालपासून सुरू करण्यात आलं आहे.
ही बातमी पण वाचा : “सांगलीतील, रिलायन्स ज्वेलसवर पडलेल्या दरोड्यातील 4 संशयितांची, रेखाचित्रं पोलिसांकडून जारी”
दरम्यान, गेल्या दोन आठवड्यांपासून शहरात, चाकूहल्ल्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. घरात, रस्त्यावर, गल्लीत कोठेही या घटना घडत आहेत. त्यामुळे नियमानुसार रात्री 11 वाजलेनंतर शहर बंद झाले पाहिज, अशी भूमिका लोहिया यांनी घेतली आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –
“शरद पवारांनी धर्मांतर करून मुस्लिम व्हावं”
मोठी बातमी! भाजपच्या ‘या’ नेत्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल
“तुम्हाला सरकार चालवता येत नसेल तर पायउतार व्हा”