“सत्ता गेल्यानंतर कुणाचा तोल जातो, तर कुणी भ्रमिष्ट होतं, यापैकी चंद्रकांत पाटलांचं काय झालं, ते पहावं लागेल”

0
470

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : सांगलीतील एका कार्यक्रमात बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची जीभ घसरली. चंद्रकांत पाटील यांनी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा एकेरी शब्दात उल्लेख केला. यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. यावर आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.

हे ही वाचा : “शिवसेनेत इनकमिंगचा धुमधडाका; मुक्ताईनगरमध्ये शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश”

सत्ता गेल्यानंतर कुणाचा तोल जातो तर, कुणी भ्रमिष्ट होतं, यापैकी चंद्रकांत पाटलांचं नेमकं काय झालंय?, याचं संशोधन करावं लागेल, अशी टीका जयंत पाटलांनी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं होतं की, आपण शरद पवारांचं बोट धरून राजकारणात आलो, त्यामुळे खासगी कार्यक्रमात त्यांनी मोदींचा एकेरी उल्लेख केला असावा, असा टोला जयंत पाटलांनी चंद्रकांत पाटलांना लगावला.

महत्वाच्या घडामोडी –

“भाजप हा बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्यांचा, ध्येयधोरणे नसलेला पक्ष”

“काँग्रेसच्या राजवटीत पेट्रोल-डिझेलसाठी आंदोलन करणारी भाजप कोणत्या बिळात लपलात?”

पाटील म्हणाले, माझी जीभ घसरली, आता नवाब मलिक म्हणतात…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here