आरं बाबा ज्याची तुला भीती नाही, ते वारंवार कशाला बोलतो; चंद्रकांत पाटलांचा संजय राऊतांवर हल्लाबोल

0
468

मुंबई : भाजपने जन आशीर्वाद यात्रा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टीका केली होती. जन आशीर्वाद यात्रा काढा की कुठल्याही यात्रा काढा जनतेचे आशीर्वाद आम्हालाच आहे, असंं संजय राऊत यांनी म्हटलं होतं. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आरं बाबा ज्याची तुला भीती नाही, ते वारंवार कशाला बोलतो, तुझ्या दंडात ताकद किती आहे ते बघ रे, असा हल्लाबोल चंद्रकांत पाटलांनी संजय राऊत यांच्यावर केला. चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

दरम्यान, मनसे-भाजप युतीची या भेटीत चर्चा होणार होती ती झाली नाही, असं चंद्रकांत पाटील यांना विचारलं असता, आमची युतीसाठी भेट नव्हतीच. एकमेकांना समजून घेणं, मनसेची परप्रांतियांबाबतची भूमिका समजून घेण्यासाठी ही भेट होती, असं स्पष्टीकरण चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिलं.

महत्वाच्या घडामोडी –

“प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांचं निधन”

“IPL 21 च्या उर्वरित सामन्यांच्या नियमांमध्ये बदल, BCCI कडून नवी नियमावली जारी”

नीरज हा मराठाच, मी स्वत: त्याच्या घरी जाऊन आलोय- संभाजीराजे छत्रपती

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं पहिल्यांदाच जाहीर कार्यक्रमात मास्कशिवाय भाषण; म्हणाले…;

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here