भाजपाच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसचा झेंडा; जिंकल्या ‘इतक्या’ जागा

0
309

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील तीन तालुक्यात 17 ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या आहेत. नागपूर जिल्हा हा भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र आता पर्यंत हाती आलेल्या निकालावरून काँग्रेसने अनेक ग्रामपंचायतीवर आपली सत्ता प्रस्थापित केली आहे.

कुही तालुका कुही तालुक्यातील 6 ग्राम पंचायतींमध्ये रंजक सामना पाहायला मिळाला. कुहीतील 6 पैकी 3 ग्रामपंचायतींवर भाजप तर 3 ग्रामपंचायतींवर काँग्रेसने विजय मिळविला आहे.

हे ही वाचा : “रायगडमध्येही मनसेचा भगवा झेंडा फडकला; सरपंच पदासह 7 जागा जिंकत ग्रामपंचायतीवर मिळवलं वर्चस्व”

कारण राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे तिन्ही नागपूर जिल्ह्यातील असल्याने ही निवडणूक भाजपसाठी अत्यंत महत्वाची व प्रतिष्ठेची मानली जात आहे.

दरम्यान राज्यातल्या 18 जिल्ह्यांमधल्या 1 हजार 165 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी रविवारी मतदान झाले. आज सकाळी मतमोजणीस सुरुवात झाली आहे.

महत्त्वाच्या  घडामोडी –

माझ्या जीवाला काही बरं-वाईट झाल्यास, शिंदे- फडणवीस जबाबदार; ठाकरे गटाच्या ‘या’ मोठ्या नेत्याचा आरोप

“मनसेनं विजयी खातं उघडलं; ‘या’ ठिकाणी 2 ग्रामपंचायतीवर मनसेचा झेंडा फडकला”

शिंदे गटाला मोठा धक्का; एकनाथ शिंदेच्या बाले किल्ल्यात ठाकरे गटाने मारली बाजी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here