“महाविकास आघाडी सरकारचा पोपट झाला, तिन्ही पक्ष्यांनी उरली सुरली इज्जत मातीत मिळवली”

0
452

मुंबई : उत्तर प्रदेशमधील लखीमपूर येथे झालेल्या हिंसाचाराविरोधात निषेध म्हणून सत्ताधारी महाविकास आघाडीने आज महाराष्ट्र बंदची घोषणा केली होती. आघाडी सरकारने पुकारलेल्या या बंदला संमीश्र प्रमाणात प्रतिसाद मिळाला. यावरून भाजप नेते निलेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली.

आज महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्ष्यांनी उरली सुरली इज्जत मातीत मिळवली. पवार साहेब आणि काँग्रेसच्या नादाला लागून शिवसेना फसली. सामान्य जनतेला आज खात्री झाली हे तिन्ही पक्ष फालतू आहेत. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा पोपट झाला, कॅमेरा घेऊन काही ठिकाणी दुकान बंद केली आणि सटकले., असं ट्विट करत निलेश राणेंनी आघाडी सरकारवर हल्लाबोल चढवला आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“कुछ तो शर्म करो…महाराष्ट्र सरकार मात्र हफ्तावसुली करण्यात मग्न”

“संवेदनाहिन मनाचं आणि अर्धवट ज्ञानाचं परफेक्ट कॉम्बिनेशन म्हणजे अमृता वहिनी”

मनसे शेतकरी हत्येला पाठिंबा देत आहे का?; राष्ट्रवादीचा मनसेला सवाल

“ठाकरे सरकारने दोन वर्षे महाराष्ट्र बंद केलाच आहे, आजचा फक्त अधिकृत”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here