भाजपनं खोटेपणाचाही संस्थात्मक प्रचार केला यामुळे…; राहुल गांधींचा भाजपवर आरोप

0
162

नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा भाजप आणि मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. यात त्यांनी भाजपवर तीन प्रमुख आरोप केले. यात कोविड, जीडीपी आणि चीनच्या मुद्द्यावर मोदी सरकार खोटं बोलल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला.

भाजप खोटेपणाचाही संस्थात्मक पातळीवर प्रसार करत आहे. भाजपने कोरोना चाचणी करण्यावर निर्बंध लावले आणि कोरोना रुग्णांच्या मृत्यूची आकडेवारी चुकीची सांगितली. जीडीपी मोजण्यासाठी नव्या पद्धतीचा उपयोग करण्यात आला. चिनी आक्रमणावर पांघरुन घालण्यासाठी माध्यमांना भीती दाखवण्यात आली. भाजपचा हा भ्रम लवकरच तुटेल आणि देशाला याची मोठी किंमत मोजावी लागेल, असंही राहुल गांधी म्हणाले.

दरम्यान, अशा प्रकारे राहुल गांधी यांनी ट्विट करत भाजपवर टीका केली आहे.

महत्वाच्या घडामोडी-

बकरा ही ऑनलाईन खरेदीची गोष्ट नाही- नसीम खान

डॉनला कोरोनाने पकडलंय त्यामुळे घरीच थांबा उगाच डॉन बनू नका; नगरपालिकेची अनोखी जाहिरात

“युजीसी विरोधात आदित्य ठाकरेंनी घेतली सुप्रीम कोर्टात धाव”

“…यामुळे फडणवीसांना महाराष्ट्रात कटोरा घेऊन फिरावं लागेल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here