फक्त घोषणा करून आणि भाषण देऊन शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नाहीत- रक्षा खडसे

0
273

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुक्ताईनगर : राज्यात काही दिवसांपूर्वी पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विर्दभात पावसाने धुमाकूळ घातला होता. या भागातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. यानंतर ठाकरे सरकारने अतिवृष्टी व पूरग्रस्तांसाठी 10 हजार कोटींचे पॅकेज घोषित केले. यावरून भाजपाच्या खासदार रक्षा खडसे यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

फक्त घोषणा करून आणि भाषण देऊन शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नाहीत, असा टोला रक्षा खडसेंनी ठाकरे सरकारला लगावला.

हे ही वाचा : फेसबुकची मोठी घोषणा ; ‘ही’ महत्त्वाची सुविधा होणार बंद

ठाकरे सरकारकडून दिवाळीनिमित्त शेतकऱ्यांना आणि जनतेला खूप मोठी अपेक्षा होती. मात्र, खूप नुकसानभरपाई म्हणून फार कमी मदत शेतकऱ्यांना देण्यात आली. या तक्रारींचे मला अनेक शेतकऱ्यांचे फोन येत आहेत. सरकारने शेतकऱ्यांकडे पूर्ण दूर्लक्ष केले, असा आरोप रक्षा खडसे यांनी केला.

महत्वाच्या घडामोडी – 

फडणवीसांनी दिवाळीनंतर बाॅम्ब फोडण्याऐवजी दिल्लीत जाऊन तोंड उघडावं- रोहित पवार

एक निवडणूक काय जिंकलीय शिवसेना पंतप्रधानपदाची स्वप्न पाहू लागलीय; भाजप नेत्याचा टोला

भाजपला देशातून हटवा, अन् पेट्रोल-डिझेलचे दर कमी करा- नाना पटोले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here