“राज ठाकरेंना कोण कशाला इजा करेल, त्यांना भिती वाटत असेल तर संरक्षण दिलं पाहिजे”

0
421

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मिशिदीवरील भोंगांच्या मुद्द्यावरुन आक्रमक भूमिका घेतल्यामुळे राज्यातील वातावरण ढवळून निघालं आहे. अशातच आज मनसे नेते बाळा नांदगावकर आणि राज ठाकरेंना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली. यावेळी मुस्लीम संघटनांकडून माझ्यासह राज ठाकरे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असून याबाबत गृहमंत्र्यांना माहिती दिल्याचं बाळा नांदगावकर यांनी सांगितलं आहे. यावरून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हे ही वाचा : “बाळा नांदगावकर आणि राज ठाकरेंना जीवे मारण्याची धमकी”

राज ठाकरे यांना कोण कशाला इजा करेल. मला नाही वाटत, राज ठाकरे यांना धोका आहे. पण त्यांना भिती वाटत असेल तर संरक्षण दिलं पाहिजे. आमची कोणताही तक्रार नाही., असा टोला जयंत पाटलांनी राज ठाकरेंना लगावला. ते माध्यमांशी बोलत होते.

दरम्यान, अलीकडे राज्यात नवीन फॅशन सूरू झाली आहे. केंद्र सरकारमधूनच संरक्षण पुरवलं जातं. त्याची दोन-तीन उदाहरणं झाली आहेत. स्वतंत्र्यानंतर केंद्र सरकार पहिल्यांदाच राज्यातील व्यक्तींना संरक्षण देत आहे. त्यामुळे तुमची भाजपबरोबर मैत्री झाली असेल तर तुम्हांलाही संरक्षण देण्याची व्यवस्था होऊ शकते, असा टोमणाही जयंत पाटलांनी यावेळी लगावला.

महत्वाच्या घडामोडी –

भाजपच्या 28 प्रमुख नेत्यांची प्रकरणं बाहेर काढणार; संजय राऊत यांचा गौप्यस्फोट

तुरूंगात दणके बसले नाहीत, याबद्दल सरकारचे आभार माना; बच्चू कडूंचा राणा दाम्पत्याला टोला

योगी आदित्यनाथ म्हणाले, आम्ही मुंबईत उत्तर भारतीयांसाठी कार्यालय उभारणार, आता आदित्य ठाकरे म्हणतात…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here