महाराष्ट्र सरकार ह्या घुसखोरांना केव्हा हुसकावणार?; मनसेचा राज्य सरकारला सवाल

0
183

मुंबई : बांग्लादेशी नागरिकांना बेकायदेशीररित्या भारताचं नागरिकत्व मिळवून देणाऱ्या टोळीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून राज्यातील एमआयएमच्या 2 आमदारांची स्वाक्षरी असलेलं लेटरहेड्स जप्त करण्यात आली आहेत. यावर मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन राज्य सरकारला सवाल केला आहे.

महाराष्ट्रात बांग्लादेशियांचे जे अड्डे-मोहल्ले उभे राहत आहेत तेच भविष्यात त्रासदायक ठरणार; हे राजसाहेब वारंवार सांगत आहेत. त्यासाठी आम्ही मुंबईत महामोर्चाही काढला होता. आता ह्या घुसखोरीला धर्मांधतेसह, राजकीय पाठबळही लाभतंय. महाराष्ट्र सरकार ह्या घुसखोरांना केव्हा हुसकावणार? असं ट्विट करत मनसेनं राज्य सरकारला सवाल उपस्ठित केला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

चंद्रकांत पाटील यांना हिमालयामध्ये जाण्याची आवश्यकता नाही- हसन मुश्रीफ

‘हे’ सरकार शेतकरी, गरीब आणि मध्यमवर्गीयांचे शत्रू आहे; प्रियांका गांधीची मोदी सरकारवर टीका

कोल्हापुरात निवडून नाही आलो, तर हिमालयात जाईन- चंद्रकांत पाटील

राज्यात दिवाळीनंतर मंदिरं सुरू होणार- राजेश टोपे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here