महाराष्ट्र राज्य बंगालच्या दिशेने वाटचाल करीत आहे; निलेश राणेंची राज्य सरकारवर टीका

0
165

मुंबई : महाराष्ट्र राज्याच्या गृहविभागाने केंद्रीय तपास यंत्रणा राज्य सरकारच्या परवानगी शिवाय कोणताही तपास आपल्या हाती घेऊ शकत नाही. तपासासाठी आता सीबीआय, ईडी सारख्या केंद्रीय तपास यंत्रणांना राज्य सरकारच्या परवानगीची गरज आहे., असा निर्णय घेतला आहे. यावरून भाजप नेते निलेश राणे यांनी प्रतिक्रिया देत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

महाराष्ट्र राज्य बंगालच्या दिशेने वाटचाल करीत आहे. बंगाल राज्यात जसे रोज मर्डर होतात, हिंदूंच्या सणांवर बंदी घातली जाते, बंगाल सरकारच्या विरोधात जी लोक बोलतात ते भर रस्त्यात फोडले जातात, पोलिसांना पक्षाचे कार्यकर्ते म्हणून वापरले जातात… महाराष्ट्रात हे व्हायला वेळ लागणार नाही., असं ट्विट करत निलेश राणे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

महत्वाच्या घडामोडी-

जेसन होल्डरची शानदार गोलंदाजी; राजस्थानचे हैदराबादसमोर 155 धावांचे लक्ष्य

सनरायझर्स हैदराबादने टाॅस जिंकला; प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय

अजित पवारांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती खोटी- पार्थ पवार

एकनाथ खडसेंना राष्ट्रवादीत मंत्रिपद मिळेल, पण त्यांच्यासोबत कोणीच जाणार नाही- रामदास आठवले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here