अजित पवारांशिवाय राजकारण… ;अजित पवारांच्या निधनावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया

0
103

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे एका भीषण विमान अपघातात निधन झाले असून, या दुर्दैवी घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणावर शोकाकुळ पसरली असून अजित पवार यांच्या निधनावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाल्याची बातमी आली, त्यावेळी प्रार्थना करत होतो की अशी कोणत्याही प्रकारची बातमी कानावर येऊ नये. अजित पवार सही सलामत त्या अपघातातून बाहेर यावेत. पण ही धक्कादायक,बातमी कानावर आली. अजित पवार यांच्याशिवाय महाराष्ट्राच राजकारण, समाजकरण हे बेचव आणि अळणी होईल. त्यांचं व्यक्तीमत्व दिलखुलास, रोखठोक, कार्यकर्त्यांना हवाहवासा वाटणार नेता होता” अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी अजित पवार यांच्या निधनावर दिली आहे.

दरम्यान “त्यांच्या जाण्याने महाराष्ट्रावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांचं बोलणं, त्यांच्या कामाची पद्धत, त्यांची प्रशासनवरची पकड या गोष्टी सैदव महाराष्ट्राच्या मनात कायम राहतील. बारामती आणि त्यांच एक नातं होतं. त्याच बारामतीत त्यांचा मृत्यू यावा हा विचित्र योगायोग आहे” असंही संजय राऊत म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या – 

नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेने पहिला भगवा फडकवला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here