Home महाराष्ट्र राहुल गांधींनी आता जनतेसमोर उठाबश्या काढाव्यात- आशिष शेलार

राहुल गांधींनी आता जनतेसमोर उठाबश्या काढाव्यात- आशिष शेलार

मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आणीबाणी ही चूक होती, असं वक्तव्य केलं होतं. यावर भाजप नेते आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राहुल गांधी यांनी आणीबाणीवरून माफी मागितली. आणीबाणी ही चूक असल्याचं कबूल केलं. आता त्यांनी जनतेसमोर उठाबश्या काढाव्यात, असा टोला शेलारांनी यावेळी लगावला. ते माध्यमांशी बोलत होते.

दरम्यान, आणीबाणी चुकीची होती. म्हणजे इंदिरा गांधी यांची त्यावेळची विचारसरणी चुकीची होती का? हे देखील राहुल यांनी स्पष्ट करावं, असंही शेलार यावेळी म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी –

“शिवसेनेचा वाघ हा काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाच्या पिंजऱ्यात अडकलाय”

कर्नाटकच्या राजकारणात मोठी खळबळ! मंत्र्याचे सेक्स व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल

“देवेंद्र फडणवीसांचा आपल्यावर असलेला विश्वास पाहून अजित पवारांना हसू अनावर”

“जयंत पाटील यांच्यानतर त्यांचे चिरंजीव प्रतीक पाटील यांना कोरोनाची लागण”