“महाराष्ट्रात आणीबाणी आहे की नाही हे जनता ठरवेल”

0
271

मुंबई : राज्यात अघोषित आणिबाणी असून सरकार विरोधात कोण काही बोललं तर त्यांना जेलमध्ये टाकण्यात येत आहे, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून प्रतिक्रिया देत फडणवीसांना प्रत्युत्तर दिलं आहे.

महाराष्ट्रात आणीबाणी आहे की नाही हे जनता ठरवेल, पण दिल्लीच्या वेशीवर सुरू असलेल्या दडपशाहीचे काय? त्या आणीबाणीवर बोला, असं म्हणत संजय राऊतांनी फडणवीसांना प्रत्युत्तर दिलं आहे.

दरम्यान, 18 दिवसांपासून पंजाब-हरियाणाचा शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करतोय. त्यांच्यावर पाण्याचे फवारे मारणे, अश्रुधूर सोडणे यास आणीबाणीचा कोणता प्रकार मानायचा? असंही सामना अग्रलेखात म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

…यामुळे मी राजकारणात येण्याच्या योग्यतेची नाही- अमृता फडणवीस

“मराठा आंदोलक आक्रमक, मुंबईतील सीएसटी परिसरात ठिय्या आंदोलन”

महाविकास आघाडी सरकार धनगरांचा तीरस्कार करतंय- गोपीचंद पडळकर

उचलली जीभ आणि लावली टाळ्याला हा भाजपचा एककलमी कार्यक्रम- अशोक चव्हाण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here