‘शिवसेनेच्या खासदारांनाच वाटतं की हे सरकार कधी पडतंय’; भाजपच्या ‘या’ नेत्याचा दावा

0
444

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : शिवसेनेच्या खासदारांना वाटतं ही हे सरकार कधी पडतंय. ते खासगीत देवेंद्र फडणवीस  यांचं कौतुक करतात, असं खळबळजनक वक्तव्य केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी केलंय. भाजपाच्या ओबीसी जागर अभियानाचा कोकण विभागीय मेळावा आज ठाण्यात पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.

हे ही वाचा : काँग्रेसचा ‘हा’ मोठा नेता शिवसेनेच्या वाटेवर?; घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

‘शिवसेनेचे खासदार अनेकवेळा भेटतात. त्यांच्या खासगीतील चर्चा, कमेंट्स आहेत, त्यांनाच असं वाटतं की हे सरकार कधी पडतंय. अशा प्रकारची भावना त्यांची झाली आहे. आणि एक गोष्ट ते अतिशय जबाबदारीने उल्लेख करतात की जेव्हा आम्ही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्याकडे जात होतो, आम्हाला त्यांच्याकडून कुठल्याही कामाला कधीच नकार आला नाही. कधीच त्रास झाला नाही. ही काम करण्याची पद्धत या मुख्यमंत्र्यांची होती’, असं कपिल पाटील यांनी म्हटंलय.

दरम्यान, कपिल पाटलांच्या या वक्तव्यानं आता राज्यातील राजकारण रंगण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या घडामोडी –

माजी गृहमंत्री काय हनीमूनला गेले काय?; अमृता फडणवीसांचा ठाकरे सरकारला सवाल

‘हिंमत असेल तर शिंगावर घ्या’; नारायण राणेंचा मुख्यमंत्र्यांना आव्हान

“शिवसेनेचे हिंदुत्व आणि मनसेचे हिंदुत्व यात जमीन-आसमानचा फरक”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here