Home महत्वाच्या बातम्या भारताला 1947 साली मिळालेलं स्वातंत्र्य हे स्वातंत्र्य नसून ती भीक होती; कंगना...

भारताला 1947 साली मिळालेलं स्वातंत्र्य हे स्वातंत्र्य नसून ती भीक होती; कंगना रनौतचं वादग्रस्त वक्तव्य

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : अभिनेत्री कंगना रनौत हिने एका वृत्तवाहिनीला मुलाखत देत भारताला 1947 साली मिळालेले स्वातंत्र्य हे स्वातंत्र्य नसून ती भीक होती, खरे स्वातंत्र्य हे 2014 साली मिळाले, असे वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. तिच्या या वादग्रस्त वक्तव्याचा सर्वच स्तरांतून निषेध केला जात आहे.

हे ही वाचा : साहित्य संमेलन गीतात सावरकरांचा उल्लेख नाही, संयोजकांनी चूक सुधारावी; मनसेची मागणी

कंगना रनौत हिला सावरकर, राणी लक्ष्मीबाई, सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दल बोलायचे होते, तेव्हा तिला माहीत होते की, रक्तपात झाला तरी हिंदुस्थानी हा हिंदुस्थानींवर वार करणार नाही. त्यांनी स्वातंत्र्याची किंमत मोजली हे खरं. पण ते स्वातंत्र्य नसून भीक होती. खरं स्वातंत्र्य तर 2014 मध्ये मिळाले अशी कंगना रनौत म्हणाली.

दरम्यान, कंगनाच्या या वादग्रस्त वक्तव्यावर निवेदिका नाविका कुमार म्हणाल्या की, “म्हणूनच सगळे तुला म्हणतात की तू भगवा आहेस.” यावर कंगना उत्तर देत म्हणाली की, “आता या विधानानंतर माझ्यावर आणखी 10 केसेस होणार आहेत.”

महत्वाच्या घडामोडी –

“राष्ट्रवादीचा भाजपला दे धक्का; ‘हा’ माजी आमदार असंख्य समर्थकांसह राष्ट्रवादीत”

अनेक शिवसैनिकांच्या संसाराच्या होळ्या करून शिवसेना उभी राहिलीये- प्रवीण दरेकर

“परभणीत राष्ट्रवादीत जोरदार इनकमिंग; काँग्रेसच्या 10 नगरसेवकांनी हाती बांधलं घड्याळ”