“3 महिन्यात 20 हजार बांधकाम कसे पाडणार?; निवडणूकीचा टार्गेट तर पूर्ण करायचं तर नाही ना”

0
428

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : कल्याण-डोंबिवली महापालिकेने शहरातील सुमारे 20 हजार अनधिकृत बांधकामे पाडण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच पुढच्या आठवड्यापासून या कारवाईला सुरुवात होणार आहे. यावरून मनसे आमदार राजू पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.

हे ही वाचा : चंद्रकांत पाटील हे पुरोगामी महाराष्ट्राला लागलेला व्हायरस; काँग्रेसच्या ‘या’ नेत्याची खोचक टीका

तीन महिन्यात वीस हजार बांधकामे कसे पाडणार? निवडणुकीचा टार्गेट पूर्ण करण्यासाठी तर हा निर्णय घेतला नाही ना? असा सवाल राजू पाटील यांनी प्रशासनाला केला आहे. ते माध्यमांशी बोलत होते.

दरम्यान, अनधिकृत बांधकामावर कारवाई झाली पाहिजे. मात्र गेल्या वर्षभर प्रशासकीय राजवट आहे. या काळात किती अनधिकृत बांधकाम झाली याचं ऑडिट झालं पाहिजे. तसेच जी बांधकामे झाली त्या संबंधित अधिकारी व बिल्डरांवर कारवाई का केली नाही? असा सवालही राजू पाटील यांनी यावेळी केला.

महत्वाच्या घडामोडी –

मनसेचा मोठा निर्णय; रूपाली पाटलांनी राजीनामा दिल्यानंतर महिला संघटना नियुक्तीस प्राधान्य”

हम तो शेर पर एहसान किया करते है, हम चुहे पे कभी एहसान नही करते; नाथाभाऊंचा गिरीश महाजनांना टोला

आगामी निवडणुकीत भाजपचा एकतर्फी विजय होईल; नारायण राणेंचा विश्वास

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here