शेतकरी आक्रमक: उद्या 8 डिसेंबरला भारत बंदची हाक; उद्या फक्त ‘या’ सेवा राहणार सुरू

0
342

नवी दिल्ली : नवीन कृषी कायद्याविरोधात निषेध करत आंदोलन करणार्‍या शेतकऱ्यांनी 8 डिसेंबर रोजी भारत बंदची घोषणा केली आहे. सिंघू सीमेवर जय किसान चळवळीतील योगेंद्र यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत बंद दरम्यान 8 तारखेला सकाळपासून संध्याकाळपर्यंत भारत बंद ठेवण्यात येणार आहे.

या बंदवेळी दुपारी तीन वाजेपर्यंत देशभर चक्का जाम आंदोलन करण्यात येईल. त्यामुळे दूध-फळ-भाज्यांच्या वाहतुकीवरही बंदी असणार आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विवाहसोहळे आणि आपत्कालीन सेवांवर कोणतंही बंधन असणार नाही. अशी माहिती सिंघू सीमेवर जय किसान चळवळीतील योगेंद्र यादव यांनी दिली आहे.

महत्वाच्या घडामोडी-

साऊथ अभिनेत्री व काँग्रेस नेत्या एम.विजयाशांती भाजपमध्ये करणार प्रवेश; पंतप्रधान मोदींची तुलना केली होती दहशतवाद्यांशी

कुंफू पांड्याची मॅच विनिंग खेळी: भारताची ऑस्ट्रेलियावर 6 विकेट्सनी मात, भारताने मालिका जिंकली

मैथ्यू वेड-स्टीव्ह स्मिथची आक्रमक खेळी; ऑस्ट्रेलियाचे भारतासमोर 195 धावांचे लक्ष्य

केंद्राने केलेला कृषी कायदा रद्द होणार नाही; चंद्रकांत पाटलांचं शरद पवारांना उत्तर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here