“बाळासाहेब थोरात खोटं बोलत आहेत, केंद्राने दूध भुकटी आयात केलेली नाही”

0
282

सांगली : राज्यातील दुध उत्पादक खूपच आक्रमक झाले आहेत. राज्य सरकारने कोणताही सकारात्मक निर्णय घेतला नसल्याने येत्या 13 ऑगस्ट ते 18 ऑगस्टपर्यंत दूध दर आंदोलन करण्यात येणार आहे. या काळात 5 लाख पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे पाठवण्यात येणार आहे, अशी माहिती माजी मंत्री सदाभाऊ खोत यांना दिली आहे. सांगलीत प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी याबाबतची माहिती दिली.

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे खोटं बोलत आहे. दूध भुकटी केंद्राने आयात केली नसताना, दूध भुकटी आयात केली, असं खोटं बोलून थोरात दिशाभूल करत आहे, असा दावाही सदाभाऊ खोत यांनी केला. जर दूध भुकटी केंद्राने भुकटी आयात केली असेल, तर त्याचा पुरावा द्यावा, अशी मागणीही खोत यांनी केली.

दरम्यान, राज्य सरकार केंद्राकडे बोट दाखवून आपली जबाबदारी झटकत आहे. काही दूध संघांचेच दूध खरेदी करत आहे. अशा गोष्टींमुळे सर्वसामान्य दूध उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होणार नाही, असंही सदाभाऊ खोत म्हणाले आहेत.

महत्वाच्या घडामोडी-

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंचं केंद्रिय मंत्र्याला पत्र, केली ‘ही’ महत्वाची विनंती

“अजित दादा आऊट ऑफ वे जाऊन कामे करतात, एखाद्याचं नसेल झालं, त्याने मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली असेल “

कोरोनाची दुसरी लाट महाराष्ट्रात येऊ देणार नाही- उद्धव ठाकरे

आम्ही जेव्हा राणेंच्या पाठीशी होतो त्यावेळी त्यांचे पोट्टे बनियनवर होते, त्यांनी मला शिकवू नये; गुलाबरावांचा पलटवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here