“अजित पवारांचं पालकमंत्र्यांना पत्र; म्हणतात…”

0
166

मुंबई : करोना संकटकाळात गोरगरीब जनतेला रेशन दुकानांमधून दिल्या जाणाऱ्या धान्य वाटपाचं प्रमाण वाढवण्यात आलं आहे. या वाटपात गैरप्रकार होऊ नये, यासाठी सर्वं पालकमंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्यात व्यक्तीश: लक्ष घालून जबाबदारी घ्यावी, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांना पत्राद्वारे केलं.

राज्यातील रेशनिंगवरील अन्नधान्याचा कोटा 3.87 लाख मेट्रिक टनांवरुन 7.74 लाख मेट्रिक टनांवर नेण्यात आला आहे. केसरी कार्डधारकांना 1.52 लाख मेट्रिक टनांचं अतिरिक्त धान्य उपलब्ध करुन देण्यात आलं आहे. गरीब नागरिकांना पुरेसं धान्य मिळावं, धान्याचं, सुरळीत वाटप व्हावं, कुणीही उपाशी राहू नये, कुणाचीही तक्रार राहू नये याकडे लक्ष देण्याची गरज आहे. त्यासाठी सर्वंच पालकमंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्यात व्यक्तीश: लक्ष घालावं आणि अन्नधान्य वाटपातील तक्रारी दूर करण्याची जबाबदारी घ्यावी, असं अजित पवार यांनी पत्रात म्हटलं आहे.

राज्यात सर्वत्र धान्यवाटप सुरु असून काही जिल्ह्यांमधून येणाऱ्या तक्रारींमुळे शिधावाटप यंत्रणेची, शासनाची नाहक बदनामी होते. ही बदनामी टाळली पाहिजे. त्यासाठी आपापल्या जिल्ह्यातील शिधावाटप यंत्रणेत गैरप्रकार होणार नाहीत याची काळजी घ्यावी, असं अजित पवार म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

महाराष्ट्रातील रुग्ण वाढ आणि मृत्यूला मुख्यमंत्री जबाबदार- नरायण राणे

ही वेळ ‘ब्लेमगेम’ची नाही; अशोक चव्हाण यांचं फडणवीसांना उत्तर

“आम्हालाही मदत करा; पाकिस्तानने भारताकडे मागितला मदतीचा हात”

वांद्र्यामधील घटना पूर्वनियोजित होती- किरीट सोमय्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here