मुख्यमंत्र्यांच्या दाैऱ्याला जेवढा खर्च, कोकणातील पूरग्रस्तांना तेवढीही मदत नाही; निलेश राणेंची टीका

0
239

मुंबई : पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात महापूरामुळे नुकसान झालेल्या नागरिकांना राज्य सरकार तातडीने मदत करणार असल्याची माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. त्यानुसार राज्य सरकारने पूरग्रस्तांना तातडीने 10 हजार रुपयांची मदतीची घोषणा केली. यावर भाजप नेते निलेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली.

काय पाप केलंय कोकणाने शिवसेनेला निवडून देऊन, १० हजार रुपयांसाठी तडफडायला लावतायत. शिवसेनेला भरभरून देणाऱ्या कोकणाला १० हजार पण एका झटक्यात नाही तर इंस्टॉलमेंट मध्ये. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री ज्यांच्या दौऱ्यावर जो खर्च होतो तितकी पण मदत नुकसानग्रस्तांना मिळत नाही., अशी टीका निलेश राणे यांनी यावेळी केली.

महत्वाच्या घडामोडी –

सरकार म्हणून जे आपल्या हिताचे आहे तेच करणार, तुम्ही अजिबात काळजी करू नका; मुख्यमंत्र्यांचा भिलवडीत पूरग्रस्तांशी संवाद

राज्यात अनेक संकटे आली, पण उद्धव ठाकरेंनी हिंमत दाखवली; शरद पवारांकडून मुख्यमंत्र्यांचं काैतुक

संजय राऊत, तुम्हाला सेना भवनच्या आत नेवून फटके टाकणार; निलेश राणेंचा हल्लाबोल

“शिक्षणमहर्षी व मराठवाड्याचे साने गुरूजी अशी ओळख असलेले आलुरे गुरूजी यांचं निधन”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here