Home महाराष्ट्र “कोल्हापूरातील विजयानंतर जयश्री जाधव पहिल्यांदाच शरद पवारांच्या भेटीला, चर्चांना उधाण”

“कोल्हापूरातील विजयानंतर जयश्री जाधव पहिल्यांदाच शरद पवारांच्या भेटीला, चर्चांना उधाण”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या जयश्री जाधव यांनी दणदणीत विजय मिळवल्यानंतर पहिल्यांदाच जयश्री जाधव या राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे. यावेळी बोलताना, अजित पवारांनी जयश्री जाधव यांचं अभिनंदन केलं.

जनतेचा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी चांगले काम करा, महाविकास आघाडीचं सरकार तुमच्यासोबत आहे, असा विश्वास दाखवत अजित पवारांनी जयश्री जाधव यांचं अभिनंदन केलं.

हे ही वाचा : भोंग्यांबद्दल सरकारला अल्टीमेटम देणाऱ्या राज ठाकरेंची औकात काय?; ‘या’ माजी आमदाराचा हल्लाबोल

दरम्यान, महाविकास आघाडी विरोधात भाजप अशा अत्यंत चुरशीच्या या निवडणुकीमध्ये काँग्रेसला गड राखण्यात यश आलं. आक्रमक प्रचार आणि नेत्यांची फौज मैदानात उतरवूनही विजय न मिळाल्याने भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जातोय.

महत्वाच्या घडामोडी –

“राज ठाकरेंची तुलना बाळासाहेबांशी होऊ शकते का?; नारायण राणेंनी दिलं उत्तर, म्हणाले… साहेब म्हणजे…”

“कुणाला धोका असेल आणि सुरक्षा पुरविली जात असेल तर हरकत नाही”

“शिवसेनेचे माजी मंत्री संजय राठोड, मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, मंत्रीपद परत मिळणार?; चर्चांना उधाण”