“चिपळूणमध्ये पूर परिस्थिती आवाक्याबाहेर, सरकारने तातडीने लक्ष घालून लोकांचे जीव वाचवण्याची गरज”

0
499

मुंबई : राज्यात जोरदार मुसळधार पाऊस कोसळत आहे. चिपळूणमध्ये आभाळ ढगफुटीचा प्रत्यय आला आहे. अतिवृष्टीनं भीषण स्थिती निर्माण झाली आहे.

रात्रभर झालेल्या मुसळधार पावसाचा चिपळूण शहराला ‘फटका बसला आहे. शहरातील अनेक भागात पाणी भरले असून बाजार पेठ ,मच्छी मार्केट ,भाजी मार्केट या सर्वच ठिकाणी पुराचं पाणी शिरलं आहे. यावर भाजप नेेते निलेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

रत्नागिरी जिल्ह्याच्या चिपळूण शहरामध्ये पूर परिस्थिती आवाक्याच्या बाहेर गेली आहे. राज्य सरकारने तातडीने जातीनिशी लक्ष घालून लोकांचे जीव वाचवण्याची गरज आहे., असं ट्विट निलेश राणे यांनी केलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“चिपळूणमध्ये आभाळ फाटलं, 5000 लोकं पुरात अडकले तर दरड कोसळून तिघांचा मृत्यू”

“देवेंद्र फडणवीस खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचे कैवारी आहेत”

“जातीचा उल्लेख केल्याप्रकरणी भारताचा टी-20 स्पेशालिस्ट सुरेश रैना वादाच्या भोवऱ्यात”

“दिलेला शब्द जागणारे व कामातही ‘दादा’ असणारे अजित दादांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here